Author: Team YuvaDisha

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्री. मच्छिंद्र पवार यांना त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव श्री. अगरवाल तसेच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पवार यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत असताना त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना मा. पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण…

Read More

बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर तसेच महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. प्राजक्ता विजयकुमार देशमुख आणि पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ. शारदा दशरथ शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन (Waste Management)’ या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशन संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व्ही.टी. जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. नवीन शैक्षणिक धोरण -…

Read More

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी राष्ट्र व समाज हितासाठी कार्य करावे प्रा . राजेंद्र चिंचोले विविध स्पर्धा परीक्षा यशस्वीतांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यासाठी मदत करावी .राज्यात शासनाच्या प्रशासकीय विभागामध्ये महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत विद्याथ्यांनी नव प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परिसराचा विकास करावा .शहरात अद्यावत वाचनालय व अभ्यासिका असून त्यात लाखो रुपयांची पुस्तके उपलब्ध आहेत. तालुक्यातील अनेक विद्यार्थी गोरगरीब व शेतकरी कुटुंबातून शिकण्यासाठी येतात विद्यार्थ्यांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा व चांगला अभ्यास करून अधिकारी बनावे, असे आवाहन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी…

Read More

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून जिल्ह्यात १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) मिळवून देण्याची विशेष मोहीम. या मोहिमेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित असलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती (SC), विजाभज (VJNT), इमाव (OBC), विमाप्र (SBC) आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. या विशेष मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी…

Read More

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमधील पीडित कुटुंबातील पात्र वारसांना आज शासकीय सेवेचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,श्रीम. करिष्मा नायर जिल्हा परिषद जळगाव यांच्या शुभहस्ते हे वितरण जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाले. ​कार्यक्रमाचा तपशील: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार, तसेच आदिवासी विकास विभागाचे निर्देशानुसार अत्याचारग्रस्त कुटुंबातील वारसांना दिलासा देण्याच्या हेतूने ‘गट-ड’ संवर्गात या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत खालील आदिवासी उमेदवारांचा समावेश…

Read More

मुंबई, प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जळगाव जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. मुंबई येथील ‘सह्याद्री’ अतिथीगृहात आयोजित विशेष सोहळ्यात राज्याचे मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते जळगावचे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) मार्फत करण्यात आलेल्या निकोप व सर्वंकष मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने २०० पैकी तब्बल १८८ गुण मिळवून ही कामगिरी साध्य केली आहे. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांसाठी Ease of Living आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी Ease of…

Read More

अनुसूचित जमातीतील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर (जि. जळगाव) यांच्या वतीने स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण १ एप्रिल २०२६ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत एकूण साडेतीन महिन्यांसाठी राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये विविध शासकीय व निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची सखोल तयारी करून घेतली जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान पात्र प्रशिक्षणार्थींना उपस्थितीनुसार दरमहा रु. १०००/- विद्यावेतन देण्यात येणार असून प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक असून निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.…

Read More

शैक्षणिक संस्था स्थापन केल्या जातात पण त्या पूर्णत्वास नेणे ही देखील एक मोठी जबाबदारी असते, आणि तीच जबाबदारी यशस्वीरित्या पार पडण्याचं काम एरंडोल येथील प्रसिद्ध दाम्प त्य श्री.प्रसादजी काबरे आणि पियुषा काबरे यांनी केले. प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल, एरंडोल या संस्थेचे अध्यक्ष म्हणून श्री.प्रसादजी काबरे यांनी CBSE Board चे शिक्षण आपल्या संस्थेत केंद्राच्या मान्यतेने विद्यार्थांना मिळावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.आणि त्यांच्याच प्रयत्नांना बळ देण्याचं काम शाळेच्या उपाध्यक्षा सौ. पियुषा प्रसाद काबरे यांनी केले. या दोघांच्याही पाठीमागे सतत खंबीरपणे उभे असतं. ते त्यांचे कुटुंब आणि शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी… या यशामागे सर्वांचेच हातभार होते. काल आलेल्या मान्यता प्रस्तावामुळे काबरे…

Read More

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी, लेखक व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे होते. कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. दीपक मराठे म्हणाले की, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेले; आपले भविष्य उज्वल केले तरी मातृभाषेची कास सोडता कामा नये. विविध क्षेत्रातील उत्तुंग यश मिळवलेल्या व्यक्तींचे मातृभाषेतील वाचन प्रचंड असते त्यामुळे ते…

Read More

चोपडा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके मंगळवार, दि. ३ मार्च २०२६ रोजी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून पारंपरिक होळी उत्सवात सहभाग घेणार आहेत. तसेच आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयोजित ‘आदिवासी विकास परिषदे’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.मंत्री उईके सकाळी ७.३० वाजता शिरपूर येथून बोऱमळी (ता. चोपडा) येथे प्रस्थान करतील. सकाळी ९ वाजता बोऱमळी येथे आगमनानंतर ते आदिवासी बांधवांच्या पारंपरिक होळी उत्सवात सहभागी होणार आहेत. आदिवासी संस्कृतीचा सन्मान व परंपरांशी नाळ जोडणे हा या सहभागाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. दुपारी १२.३० वाजता वर्डी (ता. चोपडा) येथे आदिवासी विकास विभागातर्फे भव्य ‘आदिवासी…

Read More