Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
भडगाव -विदयापीठ हे उच्च शिक्षणासाठीचे केंद्र असले तरी आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार अशा समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना व कार्यक्रम आखले जातात याचा सर्वसामान्य नागरिकांनी फायदा घ्यावा. विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागातर्फे शाळा बाह्य घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यासाठी विविध संस्थांनी प्रस्ताव सादर करावे तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परिसरात सहली आयोजन करून आपले विद्यापीठ विद्यार्थ्यांना दाखवावे असे आवाहन व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल नाना पाटील यांनी जागृती सार्वजनिक वाचना लयतर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित वाचन संस्कृती आणि आजीवन शिक्षण कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी वाय.…
जळगाव : साहित्यविश्वातील प्रतिष्ठित आणि अभ्यासपूर्ण असा ‘शब्दांगण’ दिवाळी अंक २०२५ यावर्षी वाचकांसाठी प्रकाशित झाला असून, या अंकात साहित्य अकादमी सन्मानित ख्यातनाम साहित्यिकांशी विशेष संवाद साधण्यात आला आहे. या अंकाचे संपादन डॉ. अस्मिता गुरव आणि हर्षल पाटील यांनी केले असून, मराठी साहित्यप्रेमींसाठी हा अंक एक साहित्यिक मेजवानी ठरणार आहे. विविध साहित्य क्षेत्रातील मान्यवर लेखकांचे विचार, अनुभव आणि सर्जनशील प्रवास यांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. ‘साहित्य अकादमी सन्मानित साहित्यिकांशी संवाद’ हा विशेष उपक्रम वाचकांना त्यांच्या साहित्यकृतींच्या मुळाशी नेऊन पोहोचवणारा ठरणार आहे. आकर्षक मांडणी, विषय वैविध्य आणि दर्जेदार लेखनामुळे ‘शब्दांगण’ दिवाळी अंक यंदाही वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणार आहे.…
अधिष्ठातांसह अधिकाऱ्यांची कडक भूमिका : डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्याही वाहनांना बंदी जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या गेट क्रमांक १ मधून गेल्या आठवडाभरापासून डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह इतरांची खाजगी वाहने मध्ये येण्यास बंदी घातली असल्याने आता रुग्णालयाचा परिसर मोकळा श्वास घेत आहे. अनेकदा सुरक्षारक्षकांचे नागरिकांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह वाद होतात. अनेकजण “भाऊं”सह “साहेबां”ना फोन लावतात. मात्र कुठलेही वाहन सोडले जात नसल्याने अधिष्ठातांनी सुरक्षारक्षकांच्या दक्षतेचे कौतुक केले आहे. रुग्णालयांमधील बेशिस्त पार्किंगची समस्या गंभीर होती. त्यामुळे रुग्णांना आणि रुग्णवाहिकांना पोहोचण्यास अनेकवेळा अडथळा निर्माण होत होता. शहरातील रुग्णालयाच्या आवारात खासगी वाहनांचे बेशिस्त पार्किंग सुरू होते. जागा दिसेल तेथे दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्या जात…
मुंबई -येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड्स, बांद्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत आयोजित “राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा” भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. या सोहळ्यात सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांतील उत्कृष्ट निर्यात कामगिरी करणाऱ्या उद्योगांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार कंपनीच्या उत्कृष्ट निर्यात कार्याची दखल घेऊन माननीय उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अभेद्य जैन आणि अमोली जैन यांनी स्वीकारला. सूक्ष्म सिंचन आणि कृषी क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रतिष्ठित “राज्य निर्यात पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या निर्यात पुरस्कारात २०२३-२४ या वर्षासाठी प्लास्टिक आणि…
यावल -येथील जिल्हास्तरीय असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रातील अनेक आश्रम शाळांच्या भोंगळ कारभाराकडे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने एका अनुदानित आश्रम शाळेतील इयत्ता तिसरी मधील आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेत मृत्यू झाल्याने शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली. आज सोमवार दि.१३ ऑक्टोबर २०२४ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना दि.८ ऑक्टोबर २०२५ तारखेचा संदर्भ देऊन दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमरावती येथील उज्वल शिक्षण संस्था शाखा अंतर्गत चालवली जाणारी तालुक्यातील थोरगव्हाण मनवेल येथील कै.व्ही.तांबट…
जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा महिला मोर्चाच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, सौ. कृतीका जानोडे आफे यांची जिल्हाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्य महिला मोर्चा अध्यक्षा मा. श्रीमती चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस मा. श्रीमती संगीता थोरात, तसेच जळगाव जिल्हा प्रभारी मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत विविध पदांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, महिला नेत्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. महत्वाच्या पदांवर खालील निवडी करण्यात आल्या आहेत: अध्यक्षा: सौ. कृतीका जानोडे आफे (जळगाव) सरचिटणीस: सौ. नूतन पाटील (भडगाव), सौ. साधना चव्हाण (पिंपळगाव हरे), सौ. दीक्षा गावकवाड (धरणगाव), सौ.…
जळगाव –केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयात १० ऑक्टोबर २०२५ जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य जनजागृती साप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये दिनांक 09 ऑक्टोबर २०२५ रोजी मानसशास्त्र विभाग व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर एक कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये मानसशास्त्र विभागातील एफ.वाय बीए, एस.वाय बीए आणि टी. वाय. बीए च्या एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेवून त्या विषयीची ऑनलाइन परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेत. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागाच्या संचालक डॉ. शमा सराफ, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ललिता निकम, प्रा.डॉ.रामकुमार बुधवंत, डॉ. बालाजी राऊत, प्रा. अक्षय खरात यांनी मेहनत घेतली. दिनांक १० ऑक्टोबर…
जळगाव – के.सी.ई. बी.एड. कॉलेजमध्ये बी.एड. आंतरवासीयतेच्या अनुषंगाने सहविचार सभा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली.प्रास्ताविक प्रा.नयन पाटील यांनी प्रास्ताविकात आंतरवासीयता ही शिक्षक शिक्षणातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांना शाळेच्या प्रत्यक्ष वातावरणात काम करण्याची संधी मिळते व त्यांच्या अध्यापन कौशल्यासह आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना विकसित होते, असे सांगण्यात आले. यानंतर पाहुण्यांचा परिचय, स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ अनिल झोपे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव. यांनी आपल्या भाश्नातीन विद्यार्थी-शिक्षकांना शाळेच्या प्रत्यक्ष वातावरणात काम करण्याची संधी मिळते व त्यांच्या अध्यापन कौशल्यासह आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना विकसित…
जळगाव-भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील सर्व जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार चौथ्या चरणातील राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हास्तरीय जनआक्रोश मोर्चा दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी १२.०० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा,जी.एस.ग्राऊंड, जळगाव येथुन निघणार आहे व या रॅलीचे समापन मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन करण्यात येईल. या जनआक्रोश नेतृत्व देवानंद निकम(जळगाव जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा)हे करतील. 🟣 जनआक्रोश मोर्चाचे हे आहेत राष्ट्रीय व बहुजन समाजाच्या हिताच्या या मुद्दे राष्ट्रीय मुद्दे १)सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी…
The … Other World : ‘द… अदर वर्ल्ड’ नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. ‘द… अदर वर्ल्ड’ हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी, नाले, ओढे, झरे, समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत…
