Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगांव- क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव,जिल्हा परिषद जळगाव असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन 5 ऑक्टोंबर 2025 दरम्यान जळगाव,येथे करण्यात आले होते खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहा खेळाडू विजयी झाले व तसेच त्यांची विभागीय स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली गिरीश किरण बारी, अंकित सुभाष दुग्गड, कार्तिक संजय कासार, नम्रता सिंग बारेला, शर्वरी राजेश भुजबळ, गार्गी किशोर महाजन या खेळाडूंना क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत पाटील, प्रा संदीप वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंना संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे,उपप्राचार्य श्री. आर.बी.ठाकरे, पर्यवेक्षिका…
पुणे:महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा, निकालाचा महिना याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आल्याचे एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ५ ते ९ मे रोजी महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार असून, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केला जाणार आहे. १६ मे रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.…
के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्याकडून ₹५०००/- चा विशेष पुरस्कार जाहीर जळगाव – के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२वी (विज्ञान शाखा) विद्यार्थी आयुष महेंद्र भामरे याने नुकत्याच झालेल्या भारतीय ज्ञान परंपरा (संस्कृत) ऑलिम्पियाड २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी आयुष भामरेला ₹५०००/- चा विशेष पुरस्कार जाहीर करून त्याचा गौरव केला. प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे म्हणाले, “आयुष भामरेने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश आमच्या संस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे. संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरेसारख्या समृद्ध विषयात आजच्या तरुण पिढीकडून एवढ्या उत्कटतेने सहभाग होत…
— खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत इलेक्ट्रिकल विभागातर्फे कौशल्य विकास योजना अंतर्गत” दिपन्वये २०२५”संकल्पनेतून आकाश कंदील व लायटिंग तयार करण्याचे आयोजन करण्यात आले होते . त्यात 60 पेक्षा जास्त आकाश कंदील व लायटिंग तयार करून विक्री करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले. . या कार्यक्रमात डॉ.संजय सुगंधी यांनी सांगितले कि दिवाळी हा सण भारतीय परंपरेतील मोठा सण आणि प्रकाशाचा व आनंदाचा उत्सव .अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचं प्रतीक मनाला जातो . त्याच्या प्रकाशाने जीवनाचा अंधकार दूर व्हावा म्हणून “दिपन्वये२०२५”समृद्धीचा व आनंदाचा सोहळा . या…
— खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत सायन्स अँड ह्यूमॅनिटीज प्रथम वर्ष विभागातर्फे शिक्षक पालक सभेचे आयोजन केले होते . महाविद्यालयात ओपन डे संकल्पना राबवून आयोजन करण्यात आले त्याचा हेतू असा कि प्रथम वर्ष नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी विविध अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळाला आहेत . तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांची नुकतीच प्रथम घटक चाचणी घेण्यात आली सभेमध्ये उपस्थित पालकांशी वर्गशिक्षकांनी संवाद साधत त्यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणाचे विषयानुसार पालकांना पेपर देण्यात आले . विद्यार्थ्यांची प्रगती त्या संकल्पनेतून मिळाली . पालकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती , कोणत्या विषयात पुढे आणि मागे आहेत तसेच शिक्षकांची अध्ययन अध्यापन पद्धत याचे मूल्यमापन व माहिती या संकल्पनेतून…
जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत व्यवस्थापन शाखेतील ऍग्री बिझनेस विभागातर्फे १५ ऑक्टो जागतिक अन्न दिवस २०२५ चे महत्व लक्षात घेऊन ”एक मुठ्ठी अनाज व लोकांना बी व बियाणे मोफतउपलब्ध करून देणे”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . जगातील सुमारे ७०० दशलक्ष लोक दररोज भुकेने त्रस्त असतात, तर अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनुसार दरवर्षी कोट्यवधी लोक अन्नाच्या अभावामुळे मृत्युमुखी पडतात. खास करून विकसनशील देशांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे. गरीब लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या अन्नाचा योग्य वापर आणि वितरण, कृषी उत्पादनात सुधारणा करणे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे यामुळे या समस्येवर काही प्रमाणात मात होऊ शकते. अन्न दिन म्हणजे…
आज दि. 17ऑक्टोंबर रोजी फर्दापूर गटातील सावळदबारा पंचायत समिती गण मधील गावाना सावळदबारा सह घाणेगाव, मोलखेडा, देव्हारी, जामठी, रवळा, जवळा,डाभा, आदी गावाना भेटी दिल्या आहेत गुलाबराव पाटील कोलते आण्णा यानी गाव भेटी दौरा सुरू करण्यात आला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते आण्णा आदी होते
भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील सर्व जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार चौथ्या चरणातील राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हास्तरीय जनआक्रोश मोर्चा दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी १२.०० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यास अभिवादन करुन नवीन बस स्थानकमार्गे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला… ——————————— भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील सर्व जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार चौथ्या चरणातील राष्ट्रव्यापी विशाल…
कोळगाव -आपले जीवन जगण्यासाठी व रोजगार मिळवण्या साठी आर्थिक गोष्टी साठी विज्ञान शाखेचे योगदान महत्वाचे आहे रसायन शास्त्र ची पदवी घेतली तर अन्न प्रक्रिया, सौर क्षेत्र, पेट्रोल, डिझेल, गॅस, बॅटरी व्यवसाय, प्लास्टिक, फायबर, सिंथेटीक कपडे, रंग, सिमेंट, स्टील धातूचे उद्योगात व्यवसाय व कंपन्या मध्ये संधी मिळतात, आपल्या भारतीय रसायन शास्त्र मध्ये संशोधन कार्य आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी महत्वाचे योगदान दिले असल्याने ते रसायन शास्त्रा चे जनक संबो धीले जाते ” असे उदघाटन पर विचार भडगाव महाविद्यालयाचे रसायन विभाग प्रमुख प्रा संजय झाल्टे यांनी व्यक्त केले. ते कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या…
— जिल्ह्यात महिला बाल रुग्णालय मोहाडी येथून ऑनलाईन उपक्रमात सहभाग — जळगाव – सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यभरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला बाल रुग्णालय, शासकीय रुग्णालय अंतर्गत जवळपास २९,३१५ खाटांकरिता व ५९३ आरोग्य संस्था आदी ठिकाणी रुग्णांसाठी तीन रंगात बेडशीट व आधुनिक यांत्रिकी पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेला आरोग्य मंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या शुभ हस्ते,आरोग्य राज्य मंत्री ना .मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या खास उपस्थितीत मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने राज्यभरात नुकताच शुभारंभ करण्यात आला. जळगाव जिल्ह्याकरिता महिला, बाल रुग्णालय मोहाडी येथे पालकमंत्री आदरणीय ना. गुलाबरावजी पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून आरोग्य दूत, रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी,सरपंच प्रतिनिधी…
