Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
— खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत इलेक्ट्रिकल विभागातर्फे कौशल्य विकास योजना अंतर्गत” दिपन्वये २०२५”संकल्पनेतून आकाश कंदील व लायटिंग तयार करण्याचे आयोजन करण्यात आले होते . त्यात 60 पेक्षा जास्त आकाश कंदील व लायटिंग तयार करून विक्री करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले. . या कार्यक्रमात डॉ.संजय सुगंधी यांनी सांगितले कि दिवाळी हा सण भारतीय परंपरेतील मोठा सण आणि प्रकाशाचा व आनंदाचा उत्सव .अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचं प्रतीक मनाला जातो . त्याच्या प्रकाशाने जीवनाचा अंधकार दूर व्हावा म्हणून “दिपन्वये२०२५”समृद्धीचा व आनंदाचा सोहळा . या…
— खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत सायन्स अँड ह्यूमॅनिटीज प्रथम वर्ष विभागातर्फे शिक्षक पालक सभेचे आयोजन केले होते . महाविद्यालयात ओपन डे संकल्पना राबवून आयोजन करण्यात आले त्याचा हेतू असा कि प्रथम वर्ष नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी विविध अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळाला आहेत . तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांची नुकतीच प्रथम घटक चाचणी घेण्यात आली सभेमध्ये उपस्थित पालकांशी वर्गशिक्षकांनी संवाद साधत त्यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणाचे विषयानुसार पालकांना पेपर देण्यात आले . विद्यार्थ्यांची प्रगती त्या संकल्पनेतून मिळाली . पालकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती , कोणत्या विषयात पुढे आणि मागे आहेत तसेच शिक्षकांची अध्ययन अध्यापन पद्धत याचे मूल्यमापन व माहिती या संकल्पनेतून…
जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत व्यवस्थापन शाखेतील ऍग्री बिझनेस विभागातर्फे १५ ऑक्टो जागतिक अन्न दिवस २०२५ चे महत्व लक्षात घेऊन ”एक मुठ्ठी अनाज व लोकांना बी व बियाणे मोफतउपलब्ध करून देणे”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . जगातील सुमारे ७०० दशलक्ष लोक दररोज भुकेने त्रस्त असतात, तर अधिकाऱ्यांच्या आकडेवारीनुसार दरवर्षी कोट्यवधी लोक अन्नाच्या अभावामुळे मृत्युमुखी पडतात. खास करून विकसनशील देशांमध्ये ही समस्या अधिक गंभीर आहे. गरीब लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या अन्नाचा योग्य वापर आणि वितरण, कृषी उत्पादनात सुधारणा करणे आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे यामुळे या समस्येवर काही प्रमाणात मात होऊ शकते. अन्न दिन म्हणजे…
आज दि. 17ऑक्टोंबर रोजी फर्दापूर गटातील सावळदबारा पंचायत समिती गण मधील गावाना सावळदबारा सह घाणेगाव, मोलखेडा, देव्हारी, जामठी, रवळा, जवळा,डाभा, आदी गावाना भेटी दिल्या आहेत गुलाबराव पाटील कोलते आण्णा यानी गाव भेटी दौरा सुरू करण्यात आला आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते आण्णा आदी होते
भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील सर्व जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार चौथ्या चरणातील राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हास्तरीय जनआक्रोश मोर्चा दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी १२.०० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यास अभिवादन करुन नवीन बस स्थानकमार्गे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला… ——————————— भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील सर्व जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार चौथ्या चरणातील राष्ट्रव्यापी विशाल…
कोळगाव -आपले जीवन जगण्यासाठी व रोजगार मिळवण्या साठी आर्थिक गोष्टी साठी विज्ञान शाखेचे योगदान महत्वाचे आहे रसायन शास्त्र ची पदवी घेतली तर अन्न प्रक्रिया, सौर क्षेत्र, पेट्रोल, डिझेल, गॅस, बॅटरी व्यवसाय, प्लास्टिक, फायबर, सिंथेटीक कपडे, रंग, सिमेंट, स्टील धातूचे उद्योगात व्यवसाय व कंपन्या मध्ये संधी मिळतात, आपल्या भारतीय रसायन शास्त्र मध्ये संशोधन कार्य आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांनी महत्वाचे योगदान दिले असल्याने ते रसायन शास्त्रा चे जनक संबो धीले जाते ” असे उदघाटन पर विचार भडगाव महाविद्यालयाचे रसायन विभाग प्रमुख प्रा संजय झाल्टे यांनी व्यक्त केले. ते कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या…
— जिल्ह्यात महिला बाल रुग्णालय मोहाडी येथून ऑनलाईन उपक्रमात सहभाग — जळगाव – सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यभरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला बाल रुग्णालय, शासकीय रुग्णालय अंतर्गत जवळपास २९,३१५ खाटांकरिता व ५९३ आरोग्य संस्था आदी ठिकाणी रुग्णांसाठी तीन रंगात बेडशीट व आधुनिक यांत्रिकी पद्धतीने वस्त्र धुलाई सेवेला आरोग्य मंत्री ना.प्रकाशजी आबिटकर यांच्या शुभ हस्ते,आरोग्य राज्य मंत्री ना .मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या खास उपस्थितीत मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने राज्यभरात नुकताच शुभारंभ करण्यात आला. जळगाव जिल्ह्याकरिता महिला, बाल रुग्णालय मोहाडी येथे पालकमंत्री आदरणीय ना. गुलाबरावजी पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून आरोग्य दूत, रक्तदान जनजागृती कार्याचे ब्रँड ॲम्बेसेडर मुकुंद गोसावी,सरपंच प्रतिनिधी…
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने महान शास्त्रज्ञ तथा भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. डी. एम. मराठे होते. त्यांनी वाचन हे माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते, असे अध्यक्षीय मनोगतात सांगितले . यावेळी ‘वाचन साधना’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात साने गुरुजी यांनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाच्या बालकुमार दिवाळी अंकाचे विद्यार्थ्यांना मोफत वितरण करण्यात आले. थोर हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या विटी दांडू, ईदगाह, कजाकी, चोरी, माझी मातृभूमी या प्रसिद्ध कथांचा…
काव्य कोकीळ सोपानदेव चौधरी 1 “शब्द गेले सुकोनिया । झाला त्यांचा सुकामेवा चघळीत बैसतो मी। तोच वाटे मला ठेवा ।। तुझेच यश माऊली । तुलाच मी अर्पितो ।।” 2 सोपानदेव चौधरी 3 कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या काव्यविशेषांगाचा प्रभाव त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरींवर पडणे स्वाभाविकच होते4. आईचा काव्यभाव आणि ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म अवलोकन यातून सोपानदेवांच्या कविमनाची जडणघडण होणे हेही स्वाभाविक आहे5. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९०७ रोजी असोदे या गावी झाला6. शिक्षण आणि राष्ट्रीय विचार त्यांचे प्राथमिक शिक्षण असोदे येथील सरकारी शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण राष्ट्रीय टिळक विद्यालय, जळगाव येथे झाले7. स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी सरकारी शाळा सोडून जळगावच्या राष्ट्रीय विद्यालयात प्रवेश…
सोयगाव / प्रतिनिधी विजय पगारे सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने दिव्यांगाना पाच टक्के निधीतून गावातील ५५ दिव्यांगाना दिवाळी फराळ व आनंदाचा शिधा किट वाटप केली मंगळवारी अकरा वाजता ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच स्वाती पाटील,उपसरपंच संजय पाटील,मधुकर सोनवणे, मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान दिव्यांगाची दिवाळी साजरी व्हावी या हेतूने हा उपक्रम ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी गावातील दिव्यांगाना आनंदाच्या शिधा मध्ये किराणा,एक किलो साखर,एक किलो गुळ, तेल,व इतर वस्तूचा समावेश आहे.यावेळी कृषिभूषण रवींद्र पाटील,दिलीप पाटील,प्रकाश पवार,बनेखा तडवी,अमृत राठोड,कैलास माताडे,दिलीप गाडेकर,,बाबू रामदास, आदींची उपस्थिती होती. लिपिक संतोष पाटील,सतीश बाविस्कर, अंबु राठोड, प्रकाश पवार,आदींनी पुढाकार…
