Author: Team YuvaDisha

राज्यातील उच्च शिक्षणातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार परीक्षा नोंदणी शुल्कात १५० ते २५० रुपये वाढ अपेक्षित आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे १९ विविध सीईटींमार्फत ७२ विविध अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा व प्रक्रिया राबवली जाते. यात अभियांत्रिकी, फार्मसीपासून नर्सिंग, बीएड, हॅाटेल मॅनेजमेंट अशा विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असते. या नोंदणीसाठी शुल्क आकारले जाते. संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या परीक्षांसाठी ८०० ते १००० रुपये शुल्क घेतले जाते. या परीक्षांसाठी गेल्या वर्षी १४…

Read More

*अपघातात जखमी झालेल्या भाविकांवर उपचार सुरू* जळगाव.दि- 6 ( जिमाका ) उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर जिल्ह्यात अयोध्या-प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे ४ वाजता एक भीषण अपघात झाला. अयोध्या येथून देव दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या टूरिस्ट बसला वेगवान ट्रेलरने जोरदार धडक दिली. या अपघातात पिंपळा येथील एका महिला भाविकाचा मृत्यू झाला तर अपघातात ११ जण जखमी झाले असून जखमी झालेल्या भाविकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ मदत कार्य सुरु झाले असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येशील ३० महिला व ५ पुरुष असा ग्रुप अयोध्या येथे सहलीला गेला असता त्यांचा सुलतानपूर जवळ अपघात झाला यात…

Read More

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन.एन. गायकवाड होते. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून पूजन महाविद्यालयाचे प्रयोगशाळा परिचर दिलीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधान निर्मितीमध्ये असलेल्या अनन्यसाधारण योगदानाविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे यांची…

Read More

जळगाव -थोर साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ म्हणून दिवंगत प्राचार्य डॉ. प्र.श्रा.चौधरींचे शैक्षणिक व वाड्मयीन कार्य हे आजही युवा पिढीला प्रेरणा देणारे आहेत. चौधरी सरांनी आयुष्यभर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आणि समाजातील तळागाळातील माणसांना नेहमीच प्रोत्साहन दिले,सामाजिक बांधिलकी जोपासणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते,असे प्रतिपादन डायटचे निवृत्त प्राचार्य निळकंठ गायकवाड यांनी केले. ते केसीई सोसायटीच्या व्ही.पी. होले शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्र.श्रा.चौधरी यांच्या जयंतीनिमित्त प्रा.गोपीचंद धनगर संपादित सहवास (प्र.श्रा.चौधरी-शब्दांचे क्षितिज, विचारांची पहाट) या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रभात चौधरी, विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.साहेबराव भुकन, अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी, प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्रा.गोपीचंद धनगर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित…

Read More

भारतीय संविधानातील घटनात्मक मूल्यांचा भारतीय समाज मन घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून घटनात्मक नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षितचा केलेला विचार हा देशाला प्रगतीच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून इथली जात व्यवस्था, इथली धर्म व्यवस्था, भारतीयत्वाला धोक्याची असल्याचे आज लक्षात येते आहे. राज्यकर्त्यांनी घटनात्मक मूल्य पायदळी तुडवण्याचे आणि  भारतीय संविधानाचे ठरवून पायमल्ली करण्याचे धोरण अवलंबले जात असल्याने संविधानवादी लोकशाही विचाराला अनुसरलेल्या नागरिकांनी, प्रामाणिक भारतीयांनी सजग राहण्याचे आवाहन संविधान सन्मान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी भीमरमाई प्रतिष्ठान तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित घटनात्मक नीतिमत्ता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या विषयावर व्याख्यान देताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले राज्यघटना…

Read More

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे एड्स दिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथील समुपदेशक नामदेव पाटील यांचे जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या व्याख्यानात पाटील यांनी एड्स या रोगाचे गांभीर्य, त्याची कारणे तसेच त्यावरील उपाय यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. भारतात एड्स निर्मूलनाची मोहीम आरोग्य यंत्रणेने अत्यंत सुनियोजित व मोठ्या प्रमाणात राबविल्यामुळे भारत आता पूर्णपणे एड्स निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करतो आहे, असेही त्यांनी बोलताना नमूद केले. यावेळी एचआयव्ही एड्स आजाराविषयी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त…

Read More

जळगाव -केसीई सोसायटी संचलित मू. जे. (अधिकार प्रदत्त स्वायत्त)महाविद्यालयातील ड्रीमि आइज् रिसोर्स सेंटर तर्फे व लायन्स क्लब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना. भारंबे यांनी भूषवले. प्रास्ताविकामध्ये प्रा.अक्षय खरात (समन्वयक) ड्रीमि आइज् रिसोर्स सेंटर मधील उपलब्ध सुविधांची, सहाय्यक साधनांची, व इनडोअर गेम्सची सविस्तर माहिती दिली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती लेकुळे यांनी केले. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रोहित अग्रवाल (प्रेसिडेंट, लायन्स क्लब) डॉ. गणपत धुमाळे (मणिहार लॉ कॉलेज) Mr. चौबे (डायरेक्टर, लायन्स क्लब), दर्पण पाटील (सेक्रेटरी) व किरण गांधी (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर) उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन…

Read More

जळगाव – के.सी.ई.सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागातर्फे ” शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्र भाष्य” या विषयावर एका दिवसाचे राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.यात विविध विद्यापीठांतील तत्वज्ञान विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विषय तज्ज्ञांनी सहभाग घेतला. तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांनी मान्यवरांचे स्वागत करून चर्चासत्राच्या विषयाची ओळख करून दिली.कार्यक्रमाची सुरुवात एम.जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे प्राध्यापक डॉ. अखिलेश शर्मा यांनी मंगलाचरण करून केली.जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (दिल्ली) येथील प्रो. डॉ. रामनाथ झा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, उपनिषदांमधील वाक्यांचे तार्किक विवेचन म्हणजे ब्रह्मसूत्र होय. ‘अविरोधाध्याय’ मध्ये ब्रह्म हे जगाचे निमित्त आणि उपादान कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आचार्य शंकरांनी आपल्या ब्रह्मसूत्र भाष्यात…

Read More

 जळगाव- समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव यांच्या वतीने बसस्टँड , रेल्वे स्टेशन , काव्यरत्नावली चौक, एम जे कॉलेजपरिसरात प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण आणि जिवंत अभिनयातून ‘स्वच्छतेचा संदेश’ नागरिकांपर्यंत पोहोचवला. या पथनाट्यातून स्वच्छ परिसर राखण्याचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा कमी वापर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थिनींच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे दिलेला संदेश थेट हृदयाला भिडणारा ठरला आणि उपस्थित नागरिकांनी त्याचे कौतुकाने स्वागत केले. या उपक्रमाचे संयोजन आणि मार्गदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता कोमलदास झांबरे, पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे, सौ. प्रतिभा छबिलदास लोहार, तसेच श्रीमती रोहिणी राजेश…

Read More

जळगाव – शेतीमध्ये सातत्याने होणारा रासायनिक खतांचा वापर आणि बदलत्या हवामानामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी ‘माती परीक्षण’ आणि ‘जैविक शेती’ ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी केले. मृदेचे (मातीचे) महत्त्व आणि तिचे संवर्धन याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी,मूळजी जेठा महाविद्यालयाचा ‘करियर कट्टा’ विभाग आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “आंतरराष्ट्रीय मृदा दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.शाश्वत शेती आणि मृदा संवर्धन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी शाश्वत शेती या संकल्पनेवर विशेष भर दिला.…

Read More