भारतीय संविधानातील घटनात्मक मूल्यांचा भारतीय समाज मन घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून घटनात्मक नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षितचा केलेला विचार हा देशाला प्रगतीच्या आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून इथली जात व्यवस्था, इथली धर्म व्यवस्था, भारतीयत्वाला धोक्याची असल्याचे आज लक्षात येते आहे. राज्यकर्त्यांनी घटनात्मक मूल्य पायदळी तुडवण्याचे आणि भारतीय संविधानाचे ठरवून पायमल्ली करण्याचे धोरण अवलंबले जात असल्याने संविधानवादी लोकशाही विचाराला अनुसरलेल्या नागरिकांनी, प्रामाणिक भारतीयांनी सजग राहण्याचे आवाहन संविधान सन्मान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी भीमरमाई प्रतिष्ठान तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित घटनात्मक नीतिमत्ता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या विषयावर व्याख्यान देताना व्यक्त केले ते पुढे म्हणाले राज्यघटना आणि इथली जनता एकरूप करण्यासाठी त्यांची न्याय हक्कांची जाणीव त्यासोबतच त्यांचा असणारा मतदानाचा हक्क हा शाबूत ठेवण्यासाठीची लढाई लढावी लागेल भारतीय संविधान राज्यघटना ही सर्वधर्मसमभाव सर्वसमावेशकता तत्वे धारण करणाऱ्या प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत देखील त्यांनी मांडले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.मिलिंद बागुल यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने आम्हाला माणूस म्हणून जगण्याची ,जीवनाची हमी मिळाली,शिक्षण प्राप्त करून आमची प्रगती झाली संविधानाच्या माध्यमातून हा देश जागतिक स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण करणारा ठरला हे मनोगतातून व्यक्त करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
साहित्यिक अ.फ.भालेराव यांनी प्रासंगिक मनोगत व्यक्त केले.
विचारमंचावर प्रा.डॉ.सत्यजित साळवे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष अनिल सुरडकर उपस्थित होते. कार्यक्रम स्थळ
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रा. प्रीतीलाल पवार, शिवराम शिरसाट,सुनील सोनवणे, एडवोकेट आकाश सपकाळे, युवराज माळी, महेंद्र केदार यांनी अभिवादन केले. सूत्रसंचालन मंगल बी. पाटील यांनी आभार प्रा. प्रीतीलाल पवार यांनी मानले.
