जळगाव – महिलांमधील सुप्त नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, त्यांचे सशक्तीकरण व्हावे आणि प्रशासन व संशोधन क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने केसीई सोसायटीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय “महिला नेतृत्व ” कार्यशाळेचा उत्साहात समारोप झाला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी नेतृत्व गुण उपजत असले तरी ते योग्य प्रशिक्षणाने कसे विकसित करता येतात, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर डॉ. विजेता सिंग यांनी ‘ग्लास सिलिंग’ या संकल्पनेवर व्याख्यान दिले. करिअरमध्ये प्रगती करताना महिलांना कोणत्या अदृश्य सामाजिक आणि मानसिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, यावर त्यांनी प्रकाश टाकला. दिवसाच्या उत्तरार्धात खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी ध्येय गाठण्यासाठी उत्कटता ठेवावी आणि समाजाच्या जडणघडणीत आपली भूमिका ओळखावी, असे आवाहन केले.दुसऱ्या दिवशी डॉ. संपदा नसेरी यांनी ‘महिला आणि संशोधन’ या विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय विकासासाठी महिलांनी संशोधन क्षेत्रात मोठ्या संख्येने येणे काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. दुसऱ्या सत्रात निर्मला चौधरी यांनी आपल्या जीवनातील संघर्षाचा प्रवास उलगडला. करिअर घडवताना पती आणि मुलाच्या पाठिंब्यामुळे कठीण प्रसंगांवर मात करून यश कसे मिळवले, हा त्यांचा अनुभव उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.तिसऱ्या दिवशी डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शासन व प्रशासन क्षेत्रात महिलांचे सशक्तीकरण कसे घडवता येईल, यावर विशेष सत्र घेतले.त्यानंतर डॉ. ज्योती भोळे यांनी ‘महिला सशक्तीकरण आणि प्रशासन’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामकाजात महिलांच्या अचूक निर्णयक्षमतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. समारोप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. नंदकुमार बेंडाळे उपस्थित होते. महिलांमध्ये उपजतच नेतृत्व गुण असतात, फक्त त्यांनी अधिक आत्मविश्वासाने पुढे येण्याची गरज आहे.या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन संयोजक केसीई सोसायटी शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस आणि समन्वयक भावना मानेकर यांनी केले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
